Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्याचे पालन करणारा मृत्यूसही सहजरित्या पार करू शकतो

Webdunia
रविवार, 25 एप्रिल 2021 (08:58 IST)
सत्यालाच खरे तत्व मानण्याचा उपदेश करून भगवान महावीर म्हणतात, की सत्याचे पालन करणारा मृत्यूसही सहजरित्या पार करू शकतो. असत्याचा त्याग करून खरे व हिताचेच बोलण्याचा ते उपदेश करतात.
 
ते म्हणतात की, आपल्या किवा दूसर्‍याच्या फायद्याकरीता खोटे बोलू नये. राग किवा भीतीच्या आहारी जाऊनही खोटे न बोलण्याचे ते आवाहन करतात. स्वतः तर खोटे बोलूच नये याशिवाय दूसर्‍यांनाही खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नये.
 
सत्य जर हानीकारक असेल, दुसर्‍यांना दुःख पोहचत असेल, प्राण्यांची हिंसा होत असेल तर ती गोष्ट बोलणे टाळावे. भगवान महावीरांच्या मते चोरास चोर, नपुंसकास नपुंसक, रोग्यास रोगी म्हणून संबोधणे सत्य असले तरी तो योग्य नाही.
 
यामुळे संबंधित लोकांना दुःख पोहचते. महावीरांच्या मते पायात खिळा रूतला तर थोडा वेळच वेदना होतात. त्या खिळ्यास सहज काढणेही शक्य आहे. मात्र, टोचून बोलण्याने ह्रदयावर कायमच्या जखमा होतात.
 
वर्षानुवर्षे त्या मनात राहून दुःख देत असतात. यामुळे द्वेष, वैर पसरून भीती निर्माण होते. महावीरांनी सांगितल्याप्रमाणे विचारल्याशिवाय उत्तर देणे किवा दुसर्‍याच्या मध्ये बोलणे योग्य नाही.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments