suvichar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (07:15 IST)
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
 
मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
 
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
 
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.
 
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.
 
स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.
 
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
 
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
 
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
 
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
 
रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.
 
अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
 
जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.
 
सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.
 
माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
 
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
 
जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
 
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
 
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक पोलिसांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात प्रचारमोहीम सुरू होण्याची संभावना

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे आनंदाचे वातावरण

नाशिकच्या एका छापखान्यातून 'पेपर गेम' सुरू झाला! फुटलेली नीट प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकली गेली

पुढील लेख