Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (15:27 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी देखील या निळ्या रंगाची निवड आपल्या ध्वजात केली आहे. जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो. त्याप्रमाणे सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावे, वर्ग, वर्ण, जाती, लिंग मुक्त एकसंध भारतीय समाज निर्माण व्हावा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं

खरं तर बाबा साहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचं नातं काय आहे. बाबा साहेबांनी 1927 मध्ये स्थापित केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा रंग निळा होता. या पक्षांच्या टोप्या देखील निळ्या होत्या. हा निळा रंग त्यांची परंपरा, जागृत ठेवणारा रंग आहे. आभाळासारखी निळाई समाजात रुजावी हा त्यामागचा उद्देश आहे
बाबासाहेबांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली.

त्यावेळी मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीत बाबा साहेब उभे होते. त्या पक्षाचे चिन्ह माणूस होते. नन्तर पुढे त्यांनी शेफाफे म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली त्याचे निवडणूक चिन्ह हत्ती होते. आणि झेंड्याचा रंग निळा होता. त्रिकोणी आकाराच्या निळा झेंड्यावर तारे असा पक्षाचा ध्वज होता. समता सैनिक दलाची परिषद 30 जानेवारी 1944 रोजी कानपुर येथे झाली. या परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. या मध्ये सत्मता सैनिक दलाचा झेंडा कसा असेल या बाबत चर्चा झाली. तर समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असले. रंग निळा असेल. तर ध्वजेच्या वर डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील.  मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल तर खाली SCF अशी अक्षरे असतील. खाली उजव्या बाजूला SSD अक्षरे असती.

या ध्वजेचा अर्थ आहे स्वातंत्र्य , समता, बंधुता, आणि उध्दिष्टये पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणे.. पुढे कालांतरानंतर आंबेडकरांनी राजकीय भूमिका विस्तृत करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख