suvichar

11 महिन्यांमध्ये 1100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Webdunia
विदर्भामधील सहा जिल्ह्यांमध्ये दर आठ तासाला एका शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या वर्षी 11 महिन्यांमध्ये 1057 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळल्याचं दिसून आलं आहे. 2001 पासून 15 डिसेंबरपासून 16 हजार 918 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे.  
 
2019 वर्षभरात जानेवारी महिन्यात 85, फेब्रुवारी 78, मार्च 92, एप्रिल 78, मे 98, जून 95, जुलै 105, ऑगस्ट 114, सप्टेंबर 106, ऑक्टोबर 86, नोव्हेंबर 95 आणि 15 डिसेंबरपर्यंत 35 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
 
राज्यात सर्वांत जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. या जिलह्यातील 260 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 258, अमरावती जिल्ह्यात 257, अकोला 115, वाशीम 91, वर्धा जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
 
शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर यावा यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण त्यातल्या बऱ्याच अटींच्या पूर्तता न करता आल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments