Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (09:37 IST)
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं.याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे.
 
अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे.
यात पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
 
दरम्यान, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता परतीचा पाऊस चार ते पाच दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठवड्यातच शेतीची कामं उरकून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

पुढील लेख
Show comments