Dharma Sangrah

EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (08:50 IST)
ईव्हीएम गेलं तर भाजपही जाईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमविरोधात राज्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकवटले आहे.
 
मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल असंही ते म्हणाले.
 
अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी विकसित आहेत. ते अजूनही मतपत्रिकेचा वापर करतात. जर ईव्हीएम निर्दोष असतील तरी ते देश मतपत्रिकेचा वापर का करतात? असा सवाल राज यांनी केला.
 
याच मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. या मुद्यावर जनजागृतीसाठी राज्यभरात रॅली काढण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments