rashifal-2026

अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:46 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
 
अनुराग ठाकूर यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिल्लीतील रिठाला इथं आयोजित केलेल्या एका सभेमध्ये त्यांनी व्यासपीठावरून घोषणा दिली, "देश के गद्दारों को..."
 
त्यांच्या या घोषणेला जमावातून उत्तर आलं, "गोली मारो **** को."
 
त्यावर अनुराग ठाकूर यांनी पुन्हा म्हटलं, की आवाज अगदी पाठीमागेही पोहोचला पाहिजे. गिरीराजजींना सुद्धा ऐकू आलं पाहिजे."
 
सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.
 
टेलिव्हिजन क्वीज शो होस्ट सिद्धार्थ बसू यांनी अनुराग ठाकूर यांच्या या विधानावर आक्षेप घेताना म्हटलं आहे, की विरोध करणाऱ्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करणारी ही कृती नाही का? मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments