Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी
, सोमवार, 3 मे 2021 (11:28 IST)
"निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं," असंही त्यांनी म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
 
ममता म्हणाल्या, "यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास होता." असा विश्वास तुम्हाला का होता? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. त्यामुळे जर निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या."
 
"नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतकं नव्हे तर मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं," असं ममता म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Coronavirus In Mumbai: मुंबईत जूनपर्यंत गोष्टी सामान्य होऊ शकतील, जुलैमध्ये शाळा सुरू होतील- टाटा इन्स्टिट्यूट