Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेहरूंचा संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय हिमालयाएवढी मोठी चूक

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (10:38 IST)
"काश्मीरचा इतिहास मोडून-तोडून देशासमोर ठेवला गेला, कारण ज्यांची चूक होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास मांडला जाईल," असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
"काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. हे कलम हटवण्यासाठी आम्ही अनेक वर्षं संघर्ष करत होतो. ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होतं त्यावेळी युद्धविराम का दिला गेला? त्यावेळी युद्ध थांबवण्याची काय गरज होती? संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशामधला वाद होता," असं शहा म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments