rashifal-2026

इंटरनेट हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (10:02 IST)
इंटरनेटच्या माध्यमातून लोकशाही राज्यव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.  
 
'सोशल मीडियाचा गैरवापर होऊ नये तसंच इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्तिगत अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशानं सरकार काही नियम आखत आहे. त्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.' अशी माहिती केंद्र सरकारकडून सोमवारी (21 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं.
 
दरम्यान, सोमवारीच वर्ल्ड फोन इंटरनेट सर्व्हिसेस प्रा. लि. या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं, की फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्स अॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments