Publish Date: Fri, 26 Apr 2019 (09:47 IST)
Updated Date: Fri, 26 Apr 2019 (09:55 IST)
शिवसेना भाजपने जी कामं केली त्याच मुद्यांवर ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यामध्ये आता कोणतीही भांडणं नाहीत. भाजप त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करतंय पण शिवसेना भाजपची ती युतीची कामं आहेत. आमच्यात कोणतही भांडण नाही. मला नक्कीच वाटत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु मुख्यमंत्री कोण व्हावा हा उध्दवजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा तो विषय आहे ते ठरवतील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या भाषणांबद्दल ते म्हणाले, ''मी पहिल्यांदाच बघतोय की एकही उमेदवार उभा नसलेला माणूस एवढया सभा घेतोय. त्या सभा कोणासाठी आहेत हे लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे युतीच्या मतांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. याउलट युतीच्या जास्त जागा येतील''.
webdunia
Publish Date: Fri, 26 Apr 2019 (09:47 IST)
Updated Date: Fri, 26 Apr 2019 (09:55 IST)