rashifal-2026

पावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

Webdunia
मंगळवार, 24 जुलै 2018 (14:57 IST)
पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंदघ्यायचा असतो. जर तुम्हीही अशाच काही खास ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगत आहोत. 
 
कोडायकनाल
तमिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. 
 
देवरियाताल
मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी. 
 
मुन्नार
केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता. 
 
बिष्णुपूर
पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनुभव देतील. 
 
जीरो
अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही. 
 
उदयपूर
उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोहक वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपटाने इतिहास रचत १००० कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला

गर्दीपासून दूर कुठेतरी जायचंय? कोकणातील 'ही' समुद्रकिनारे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे

अजित पवार यांच्या निधनाने भावूक झालेले अभिनेते गजेंद्र चौहान म्हणाले-'दादा' यांचे निधन हे खूप मोठे नुकसान आहे

Ajit Pawar's Death चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

पार्श्वगायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनाला निरोप दिला

पुढील लेख
Show comments