Dharma Sangrah

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

Webdunia
शनिवार, 22 जून 2024 (11:20 IST)
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. संत कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते, त्याचा उल्लेख त्यांच्या कृतीत आढळतो. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. प्रत्यक्षात कबीर हे जगप्रेमी व्यक्तिमत्त्वाचे कवी मानले जातात.
 
कबीर यांच्या जन्माविषयी अनेक रहस्ये आहेत. काही लोकांप्रमाणे रामानंद स्‍वामी यांच्या आर्शीवादाने  काशी येथील ब्राम्हणाच्या विधवा असलेल्या महिलेच्या गर्भाशयातून त्यांचा जन्म झाला. रामानंद स्वामींनी काबीरदासजीच्या आईला चुकून पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिला होता. त्यांच्या आईने कबीरदासांना लहरतारा तालजवळ फेकून दिलं होतं. काही लोक असे म्हणतात की कबीर जन्माने मुस्लिम होते आणि नंतर त्यांनी आपल्या गुरु रामानंद यांच्याकडून हिंदू धर्माचे ज्ञान घेतले.
 
कबीरच्या आई-वडिलांविषयी लोकांचे म्हणणे आहे की, नीमा आणि नीरू हे बनारसला जात असताना दोघेही विश्रांतीसाठी लहरतारा तालाजवळ थांबले. त्याच वेळी नीमाला कबीरदास जी कमळाच्या फुलामध्ये गुंडाळलेले सापडले. कबीरचा जन्म हा कृष्णाच्या जन्माप्रमाणेच मानला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे कृष्णाला जन्म देणारी आई वेगळी होती आणि संगोपनकर्ता वेगळी होती. त्याच प्रकारे, कबीरदासांना जन्म देणारी आणि पोषण करणारी आई वेगळी होती.
 
कबीर अशिक्षित होते, त्यांना धर्मगुरूंचे ज्ञान त्यांचे गुरु स्वामी रामानंद यांच्याकडून मिळाले. संत कबीरदास यांनासुद्धा आपल्या गुरूंकडून शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एके काळी रामानंद स्वामींनी केलेल्या सामाजिक दुष्परिणामांविषयी कबीरांना जेव्हा कळले तेव्हा कबीर त्यांना भेटायला गेले. त्यांच्या दारात पोहोचल्यानंतर कबीर यांनी त्यांना भेटण्याची विनंती केली तेव्हा त्यांना कळले की स्वामीजी मुसलमानांना भेटत नाहीत, पण कबीरदास यांनी हार मानली नाही.
 
स्वामीजी रोज सकाळी आंघोळीसाठी पंचगंगा घाटावर जात असत. स्वामीजींना भेटण्याच्या उद्देशाने कबीरदास जी घाटाच्या वाटेवर झोपायला गेले. स्वामीजी आंघोळीसाठी जात असताना त्यांचे खटाऊ कबीरदास यांना लागले. स्वामीजींनी राम-राम असे म्हणत कबीरदासजींना विचारले, आपण कोण आहात? कबीरदास जी म्हणाले की ते त्यांचे शिष्य आहेत. तेव्हा स्वामीजींनी आश्चर्यचकितपणे विचारले की त्यांनी काबीरदास जी यांना कधी आपले शिष्य बनविले? मग कबीरदास जी म्हणाले की - आता जेव्हा त्यांनी राम... राम म्हणत त्यांना गुरु मंत्र दिला तेव्हाच ते त्यांचे शिष्य झाले. कबीरचे असे शब्द ऐकून स्वामीजी खूष झाले आणि त्यांनी कबीरदास जी यांना आपला शिष्य बनवले.
 
कबीरदासांच्या घरगुती जीवनाबद्दल बोलयाचे तर कबीर यांचा विवाह वनखेडी बैरागीची पालिता कन्या "लोई" बरोबर झाले होते. त्यांच्याकडून कबीरदास यांना दोन मुले झाली, मुलगा "कमल" आणि मुलगी "कमली". कबीरदासांच्या मुलाला कबीरची मते आवडत नव्हती, याचा उल्लेख कबीरांच्या रचनेत आढळतो. कबीर यांनी त्यांच्या रचनांमध्ये मुली कमलीचा उल्लेख कुठेही केलेला नाही.
 
असे म्हटले जाते की कबीरदासांनी काव्य कधीच लिहिली नव्हती, फक्त त्यांच्याद्वारे बोलल्या जात असे. त्यांच्या कविता नंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिल्या. लहानपणापासूनच कबीर यांना साधु संगत खूप आवडत होती, ज्याचा उल्लेख त्यांच्या रचनांमध्ये आहे. कबीर यांच्या रचनांमध्ये प्रामुख्याने अवधी आणि साधुक्‍कडी भाषांचा समावेश आहे. कबीर यांना राम भक्ती शाखेचे मुख्य कवी मानले जाते. त्यांच्या रचनांमध्ये गुरू ज्ञान आणि सर्व समाज आणि भक्ती यांचं उल्लेख आढळतो.
 
आयुष्यभर काशीमध्ये राहिल्यानंतर कबीर मगहरला गेले. त्याच्या शेवटच्या वेळेबद्दल मतभेद आहेत, परंतु असे म्हटले जाते की 1518 च्या सुमारास त्यांनी मगहर येथे अखेरचा श्वास घेतला आणि एक विश्वप्रेमी आणि ज्याने आपले संपूर्ण जीवन समाजाला दिले त्यांनी जगाला निरोप दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शिवजयंती सूत्रसंचालन मराठी Shiv Jayanti 2026 Sutra Sanchalan Marathi

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एआय फोटो शेअर करत म्हटले आहे की, "जेव्हा मित्र भेटतात"

अमरावती: बडनेरा येथे बनावट डॉक्टरांवर मोठी कारवाई, पदवीशिवाय चालवत होता क्लिनिक

LIVE: मनसे उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेना-भाजपमध्ये जाईल?

अजित पवार यांच्या निधनानंतर अनावश्यक राजकारणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली

पुढील लेख
Show comments