Dharma Sangrah

प्रतिभावंत साहित्यकार शिवराम महादेव परांजपे

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (22:41 IST)
मराठीचे एक प्रतिभावान मराठी साहित्यकार,उपरोधी शैलीचे लेखक, झुंझार पत्रकार प्रख्यात राजकारणी शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म  27 जून 1864 रोजी महाड येथे झाला.त्यांचे प्रारंभिक शिक्षण महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे झाले.
डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांना ''भगवानदास ''आणि ''झाला वेदांत'' पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यानंतर त्यांची पुणे येथील महाराष्ट्र महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
जेव्हा देशाचे वातावरण तापले होते तेव्हा त्यांनी जनमानसात देशभक्तीची ज्वाला पेटविली आणि  'काळ' आणि 'स्वराज्य' नावाची साप्ताहिक वृत्तपत्रे काढली.ही वृत्तपत्रे जनमानसाच्या मनात देशभक्ती आणणारी होती.

ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यात त्यांना यश आले. या साठी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लागला आणि त्यांना 19 महिन्याचा तुरुंगवासाच्या सामोरी जावे लागले. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते गांधीजींचे समर्थक झाले.त्यांनी आपले आयुष्य ललित वाङ्मय, न्याय, ज्ञानशास्त्र,मराठा युद्धे,शूद्रांची व्युत्पत्ती अशा अनेक विषयांवर लिहिले. त्यांची व्यंगात्मक शैली प्रभावी होती.ते मराठीचे गद्यकवी होते.   

'काळातील' प्रक्षोभक लेखनामुळे त्यांना 'काळकर्ते' म्हणून संबोधले.फर्डे वक्ते असणारे शिवराम आपल्या अस्खलित भाषणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे.त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुळे बेळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नेमले. 27 सप्टेंबर1929 रोजी त्यांचे निधन झाले.  

परांजपें यांनी सुमारे एक हजार राजकीय आणि सामाजिक लेख, लघुकथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली आहे.ते खालील प्रमाणे आहे.
* काळातील आणि स्वराज्यातील  निवडक निबंध (निबंध संग्रह 11 भागांमध्ये )
* मानाजीराव (नाटके)
* पहिला पांडव(नाटके)
* संगीत (कादंबरी)
* गोविंदाची गोष्ट(कादंबरी)
* विंध्याचल (कादंबरी )
रामायणातील काही विचार,मराठ्यांच्या लढायांचा इतिहास,ग्रंथ संपदा इत्यादी. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

सासरी पोहोचल्यानंतर चार तासांत वधूचा पळून जाण्याचा प्रयत्न; चौकशीत 'बनावट लग्न' करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

LIVE: महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे उघडली

सरकारी विद्यापीठे आरएसएस ताब्यात घेत आहे! रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ

पुढील लेख
Show comments