rashifal-2026

महापालिका निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय

Webdunia
सोमवार, 6 जून 2022 (14:51 IST)
इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणामुळे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. राज्यातील १४ महापालिकांची निवडणूक प्रक्रिया जुलै ते ऑक्टोबरदरम्यान होतील असे संकेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय तातडीने निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. सुनावणीदरम्यान १५ दिवसात निवडणूक जाहीर करा असे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. परंतु पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण असल्याचे निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले. कोकण आणि मुंबईत पूर परिस्थिती असते. त्यामुळे निवडणुका घेणे अडचणीचे ठरू शकते असे आयोगाने सांगितले. परंतु ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो अशा ठिकाणी निवडणुका घेण्यास काय अडचण आहे असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. जिल्हानिहाय बैठक घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असे आदेश न्यायालयाने दिले होते.
निवडणूक आयोगाने १४ महापालिकांच्या आयुक्तांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार प्रभाग आणि आरक्षण सोडत, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदाययादी जाहीर करणे आणि निवडणूक अशी प्रक्रिया असेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकीची मतदारयादी ७ जुलैपर्यंत जाहीर होणार असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
त्यामुळे १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतही झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर होताच निवडणुकांसाठी ३१ मे पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिका, कोल्हापूर, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या शहरातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

जिल्हा परिषद निवडणुका; पुणे, कोल्हापूर आणि लातूरसह १२ जिल्ह्यांमध्ये उद्या मतदान, ९ तारखेला मतमोजणी

SIR वादात ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ शिवसेना (UBT) उतरली, दुबे म्हणाले, "अगदी वरिष्ठ वकीलही असे धाडस दाखवत नाहीत

गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त

LIVE: गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

'पवारांना त्यांचे शिष्य सल्ला देत आहे,' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळांवर संजय राऊत यांचा कडक उपहास

पुढील लेख
Show comments