Festival Posters

प्रियांकाचे लग्न-दीपिकाची रिसेप्शन पार्टी एकाच दिवशी?

Webdunia
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:44 IST)
बॉलिवूडमध्ये सर्वात अधिक चर्चा होत आहे, ती म्हणजे बड्या स्टार्सची लग्ने. मग ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास असो वा रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण. दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. तर प्रियांका-निक जोनासचे लग्नदेखील चर्चेत आहे. मध्यंतरी, प्रियांकाचे लग्न आणि दीपिकाच्या लग्नाचे रिसेप्शन एकाच दिवशी होणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 14-15 नोव्हेंबरला दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर भारतात दोन रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. एक मुंबईत 21 नोव्हेंबरला तर दुसरे दीपिकाच्या होम  टाऊन बंगळुरुमध्ये 28 नोव्हेंबरला आयोजित केले जाईल. याआधी 1 डिसेंबरला रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात होते. प्रियांका आणि निकयांचे लग्न दीपिकाचे रिसेप्शन सोहळा संपल्यानंतर होणार आहे. प्रियांकाच्या लग्नाचा सोहळा 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दोघांचे जोधपूरच्या उमैद भवन पॅलेसमध्ये लग्न होणार आहे. 21 ऑक्टोबरला दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर कार्ड जाहीर करून आपल्या लग्नाची तारीख सांगितली होती. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दोघे लेक कोमो इटलीतील आलिशान विला डेल बालबियानेलोमध्ये लग्न करू शकतात. रॉयल लग्नासाठी हे ठिकाण प्रसिध्द आहे. लग्न सोहळ्याला 30 पाहुणे येणार असल्याचे वृत्त आहे. लग्नात केवळ कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र-परिवार सहभागी होणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

उन्हाळ्यात भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या; जेथील थंड दऱ्या तुम्हाला देतील एक विलक्षण अनुभव

भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी, अक्षय कुमारने असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून घेतलेला मोठा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलू शकतो

मिर्झापूर: द मूव्ही हा सीझन ४ नसून एक नवीन अध्याय आहे, ज्यामध्ये नवीन कथा आणि मोठे बदल आहेत

पुढील लेख
Show comments