मुंबई- पाकिस्तानने भारतीय चित्रपटांसाठी आपले दरवाजे उघडल्यानंतर भारतानेही पाकिस्तानबद्दलची आपली कठोर भूमिका मवाळ करावी, असे मत बॉलीवूडचे निर्माते राकेश रोशन यांनी व्यक्त केले. त्यांच्या प्रोडक्शन हाऊची निर्मिती असलेला काबिल चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांनी हे मत व्यक्त केले.
उरीमध्ये 18 सप्टेंबरला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइकद्वारे बदला घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याचा चित्रपट क्षेत्रालाही फटका बसला. भारतामध्ये पाकिस्तानी कलाकरांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली तर पाकिस्तानने आपल्या चित्रपटगृहांमध्ये बॉलीवूड चित्रपटांचे प्रदर्शन बंद केले.