Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिर खानच्या या कामामुळे खूश झाले पंतप्रधान, सोशल मीडियावर केली प्रशंसा

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2019 (12:07 IST)
बॉलीवूड अॅक्टर आमिर खान (Aamir Khan) समाजाशी निगडित मुद्द्यांवर नेहमी आपले मत मांडत असतो. सध्या संपूर्ण देशात पाण्याची किल्लत सुरू आहे. पाण्याच्या वाढत्या किल्लतीमुळे मोदी सरकारने 'जल शक्ती अभियान' (Jal Shakti Abhiyan)ची सुरुवात केली. या अभियानात फक्त सामान्य लोकच नव्हेतर खास लोकांची देखील प्रशंसा करण्यात आली आहे. नुकतेच पीएम मोदी (PM Modi)यांच्या या अभियानाची आमिर खानने तारीफ करत एक पोस्ट केली. ही पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
आमिर खानने ट्विट केले - 'पाण्याला मौलिक आणि प्राथमिक मुद्दा बनवण्यासाठी आपल्या द्वारे उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमचे पूर्ण समर्थन तुम्हाला आहे. आमिर खानच्या या पोस्ट नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करत कमेंट केले.' पीएम मोदी यांनी लिहिले - 'पाण्याला वाचवणे आणि लोकांना यासाठी जागरूक करणे आमिर खानचे हे प्रयास एकदम योग्य आहे.' 
पीएम मोदी यांनी 30 जून रोजी 'मन की बात' कार्यक्रमात देशात वाढत्या जल संकटाचा मुद्दा उचलला होता. त्यांनी म्हटले की आम्ही पावसाचे फक्त 8 टक्के पाणीच जमा करू शकतो. जर जल संग्रहाची क्षमता वाढवण्यात आली तर यामुळे जल संकटापासून आपण बाहेर येऊ शकतो. पीएम मोदी यांच्या या 'जल शक्ती संरक्षण'ची प्रशंसा करण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments