rashifal-2026

प्रियांका-निकच्या लग्नाला मोदी राहाणार उपस्थित?

Webdunia
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (11:15 IST)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्राची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्र असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून 30 नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानधील जोधपूर येथे लग्र होणार आहे. या विवाहसोहळ्याला कोण कोण उपस्थित राहाणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. निक जोनास नुकताच दिल्लीमध्ये होता. त्यावेळी निक आणि प्रियांका यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना लग्राचे आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, या लग्रसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या व्यस्त कामांमधून या लग्राला उपस्थित राहाणार का हा प्रश्र्न आहे. प्रियांका आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय चांगले असल्याचे आपण याआधीही पाहिले होते. परदेशातील त्यांच्या एका दौर्‍यादरम्यान प्रियांकाने त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही या दोघांचे असणारे चांगले संबंध समोर आले होते. दरम्यान, 2017 पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत त्यांचा साखरपुडा पार पडला. मध्यंतरी निक आणि प्रियांकानं राजस्थानला भेट दिली होती. त्यानंतर इथल्याच राजमहालात विवाह करण्याचं दोघांनीही निश्चित केलं. जोधपूरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निक लग्र करणार आहेत. भारतीय पद्धतीनं मेंदी, संगीत, हळद असे विधी होणार आहेत. त्याचबरोबर ख्रिश्चनपद्धतीनंही विवाहसोहळा होणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

नवर्‍याला मिळाला अलादीनचा चिराग

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच मौन सोडले, स्वतंत्र प्रार्थना सभा का आयोजित केल्या गेल्या हे स्पष्ट केले

पुढील लेख
Show comments