suvichar

कार्तिक-जान्हवी यांच्यात दुरावा?

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)
चित्रपटसृष्टीत सतत कोणत्या न कोणत्या स्टार कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा सुरूच असतात. तशाच त्यांच्या नातेसंबंधातील दुराव्याच्या गोष्टीही समोर येतात. अशी एक चर्चा कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्याबाबतीत सुरू आहे. कार्तिक आणि जान्हवी या दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील या दोघांना गोव्यात एकत्रित सेलिब्रेशन करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. परंतु दोघांनी एकमेकांना अनफॉलो का केले यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. 
 
कार्तिक आणि जान्हवीच्या चाहत्यांना वाटते की, त्या दोघांमध्ये दुरावा‍ निर्माण झाल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर दोघेही खूप अॅहक्टिव्ह असतात. आश्चर्याची बाब म्हणजे जान्हवी आणि कार्तिक हे दोस्ताना-2 मध्ये एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पण त्यापूर्वीच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या दोघांमधील रिलेशनशिपवर चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

पुढील लेख
Show comments