लवकरच राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ चित्रपटाचा तिसरा भाग येत असून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या भूमिका या चित्रपटात असणार नाहीत. या दोघांनी ‘सरकार राज’ या दुसर्या सिक्वेलमध्ये काम केले होते. 26 ऑगस्टला ‘सरकार’च्या तिसर्या सिक्वेलची पहिली झलक दिसणार आहे.
ट्विट करुन ही बातमी रामूने चाहत्यांना कळवली आहे. ‘सरकार’ चित्रपटाचा पहिला भाग 2005 मध्ये आला होता. यात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. प्रेक्षकांनी सरकारच्या दोन्ही भागांना प्रचंड प्रतिसाद दिला होता. अमिताभ बच्चन तिसर्या सिक्वेलमध्ये आहेत किंवा नाही याची काहीच कल्पना राम गोपाल वर्माने दिलेली नाही.
‘पहिल्या दोन भागांपेक्षा तिसरा भाग रोमांचक असेल. यातील कलाकारांची घोषणा लवकरच होईल, असे रामूने ट्विटरवर लिहिले आहे.