Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या''

Webdunia
मुंबई- शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सुपरस्टार रजनीकांत हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी जोरदार मागणी धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.
 
विधानसभेत आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत अभिनेते रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी केली. मराठमोळ्या रजनीकांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेतील चित्रपटात मिळवलेले यश अङ्खलातून असेच आहे, असे गोटे म्हणाले. रजनीकांतच्या चित्रपटाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा असाच आहे. रजनीकांत महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देवून गौरव करावा तसेच त्यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही अनिल गोटे यांनी सभागृहात केली.
 
दरम्यान, रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 250 कोटींची कमाई केली आहे. ‘कबाली’ चित्रपट पाहण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, तमिळनाडू येथे सुटी जाहीर करण्यात आली होती.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments