Marathi Biodata Maker

यशवंतराव चव्हाण एक अव्दितीय व्यक्तीमत्व

Webdunia
शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (13:32 IST)
मी लहानपणापासून शाळेत, नंतर महाविद्यालयात शिकत असताना माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जीवनातील अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या आहेत. त्यांचा जीवनपट अनेक पुस्तकातून वाचला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः न डगमगता खंबीरपणे उभे कसे रहायचे हे मी यशवंतराव चव्हाण साहेबांकडूनच शिकलो असे स्पष्टपणे सांगतो. गरीब कुटुंबात जन्म झाला असला तरी सुद्धा आणि लहान वयातच वडिलांचे डोक्यावरील छत्र गमावून आईने ज्या ताकदीने आणि सुसंस्काराने यशवंतरावांना घडविले, त्याचा उपयोग अखंडपणे जीवन जगत असताना त्यांनी केला.
 
आई हा सर्वप्रथम आणि सर्वोत्कृष्ट गुरूही असते. आपण जरी गरीब म्हणून जन्माला आलो, ही आपली चूक नाही. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण बदल घडवू शकलो नाही तर मात्र आपले जीवन व्यर्थ गेले असे समजायला हवे, असे विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहेत. गणपतराव रघुनाथराव कणसे यांनी लिहिलेले छोटेखानी पुस्तक मला वाचावयास मिळाले. ‘सह्याद्रीचा कोहिनूर’ यशवंतराव चव्हाण साहेबांची मराठी चरित्रमाला वाचून असे वाटते की, खूप कमीत कमी शब्दांमध्ये कणसे सरांनी संपूर्ण यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट दर्शविला आहे.
 
यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक अडचणींवर कशा पद्धतीने मात केली, त्याचबरोबर यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहचून सुद्धा समाजातील, तळागाळातील व्यक्तींसाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे धडपडणारे आणि गगनाला स्पर्श करतानासुद्धा स्वतःचे पाय जमिनीशी घट्टपणे रोवून उभे राहणे हे क्वचितच व्यक्तींना जमते. अशा प्रकारच्या व्यक्तीमत्वाबद्दल प्रत्येकाला एक वेगळीच उत्सुकता असते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेकजण आज वाटचाल करीत आहेत. यशवंतरावांनी ज्याप्रमाणे जीवन जगले आहेत त्याच्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आज समाजामध्ये प्रत्येकाची आहे.
 
गणपतराव कणसे सरांनी संपूर्ण यशवंतराव चव्हाण एका छोटेखानी पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे. कोणतीही व्यक्ती हे पुस्तक एक बैठकीमध्ये सहज वाचून काढू शकते. ‘सह्याद्रीचा कोहिनूर’ हे छोटेखाणी पुस्तक वाचून माझ्या ज्ञानामध्ये यशवंतरावांच्या खंबीर नेतृत्व गुण कौशल्याची भर पडली त्याबद्दल मी लेखकाचे आभार मानतो. लेखक श्री. गणपतराव रघुनाथराव कणसे आणि कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.

- मंगेश विठ्ठल कोळी (9028713820)
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

दृष्टी कमकुवत झाली, या पदार्थांचा आहारात समावेश करा

NCERT Recruitment 2025: 10वी-12वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी उत्तम भरती; अर्ज करा

त्वचेसाठी सूर्यफूल बियाणे फायदेशीर आहे वापरण्याची पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

पुढील लेख
Show comments