Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे

Webdunia
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:06 IST)
गाईंसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार, गाईंच्या प्रजाती सुधारणार - पियूष गोयल 
ग्रामीण कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG कनेक्शन पुरवण्याची योजना
बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार
- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर
- २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
- तीन हफ्त्यांमध्ये जमा होणार रक्कम
- १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार... १ डिसेंबर २०१८ पासून योजना लागू
- शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे.  
 
जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा सर्व खर्च केंद्र सरकार करण्यार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.  

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments