Publish Date: Mon, 28 Sep 2020 (08:34 IST)
Updated Date: Mon, 28 Sep 2020 (08:36 IST)
राज्यात रविवारी कोरोनाचे १८,०५६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३८० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६६% एवढा आहे.
रविवारी १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. या आकड्यानुसार राज्यात आतापर्यंत एकूण १०,३०,०१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१% एवढे झाले आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ९२,५३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,५६,४०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ४९,४१,६२८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ९४,५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.