Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादमध्ये दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त प्रमाणपत्र अनिवार्य

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (07:59 IST)
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात १८४ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये चिकन, मटण आणि किराणा मालाची दुकाने चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महानगरपालिकेने दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महानगरपालिकेने शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेतच लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, जिल्ह्याता अँटीजेन टेस्ट वाढवणार असल्याचे औरंगाबादचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते. भाजी, फळं, दूध, सलून, चिकन, मटण या व्यापाऱ्यांची टेस्ट होईल पुढील दोन दिवसात होईल, असेही आयुक्तांनी सांगितले होते. 
 
सध्या शहरात १५ ठिकाणी व्यापारी संघाने निश्चित केलेल्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्ट सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

सैफ प्रकरणावर बोलले नाना पटोले,फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर निशाना साधला

LIVE: मुंबईत उद्या रेल्वेचा 4 तासांचा मेगाब्लॉक

अमरावतीमध्ये काळी जादू करत असल्याचा संशय घेऊन महिलेला दिले चटके, लघवी पाजत कुत्र्याची विष्ठा खाण्यास भाग पाडले

राष्ट्रवादीच्या शिर्डी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेवर चर्चा,4,000 महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले

उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव करत विदर्भाने अंतिम फेरी गाठली

पुढील लेख
Show comments