rashifal-2026

वर्धात ऑगस्ट अखेरपर्यत २१ हजार व्यक्तींना कोरोना होऊन गेला

Webdunia
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (10:14 IST)
वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यत २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. संसर्गाचे हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच १.५० टक्के असल्याचे यातून आढळून आले आहे.
 
सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था व जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट महिन्यात सिरो म्हणजेच प्रतिपिंडे सर्वेक्ष करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चाचण्यांमधून केवळ २०५ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली होती. मात्र, त्याचवेळी २१ हजार लोकांना संसर्ग झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच संसर्गाचे हे प्रमाण अत्यल्प म्हणजे १.५० टक्के असून जिल्ह्यातील लोकसंख्येची रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास बराच कालावधी लागणार असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
 
लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रत्यक्षात दिसू शकत नाही. म्हणून खऱ्या संक्रमणापेक्षा रूग्णाची संख्या कमी दिसते. लोकसंख्येच्या प्रमाणात खऱ्या संसर्गाच्या टक्केवारीची माहिती देणारा अभ्यास म्हणजे प्रतिपिंडे सर्वेक्षण होय. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातल्या सर्वसाधारण लोकांव्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या तसेच संसर्गाची जोखीम असणाऱ्या व्यक्तींचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता.
 
या सर्वेक्षण पथकाने तीस गावं, दहा शहरी प्रभाग व वीस निष्क्रिय प्रतिबंधित क्षेत्रांचा अभ्यास केला. प्रामुख्याने आरोग्य सेवा कर्मचारी, पोलीस व सुरक्षा कर्मचारी, भाजीपाला व दुध विक्रेते, औद्यगिक कामगार व प्रसिध्दी माध्यमातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण लोकसंख्येत १.५० टक्के (ग्रामीण १.२० टक्के व शहरी भागात २.३४ टक्के) संसर्गदर दिसून आला. एकूण बाधित असलेल्या प्रत्येक रूग्णामागे शंभर लोकांना संसर्ग होऊन गेल्याचे हा अभ्यास सांगतो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख