suvichar

96 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर 301 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

Webdunia
बुधवार, 6 मे 2020 (09:02 IST)
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 58, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 3, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 18 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 4 असे एकूण 96 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
301 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 102, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 84, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 69 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 46 असे एकूण 301 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
14 दिवसानंतर तपासणासाठी पाठविले घशातील स्त्रावांचे नमुने
रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 22 बाधित रुग्णांचे 14 व्या दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुनेही तपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 67, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 11, कोरोना बाधित मृत्यु- 2 तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 80 इतकी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात राजकीय भूकंप: अजित पवार गटाचे १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

४ विधान परिषद जागांसाठी भाजपमध्ये प्रचारमोहीम सुरू

महाराष्ट्रातील एसआयआरमधून २९ दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुढील लेख
Show comments