Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

75 दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्ण, गेल्या 24 तासांत 60471 नवीन प्रकरणे, 2726 मृत्यू

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (12:09 IST)
देशात 75 दिवसांनंतर कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 60,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि कोरोना विषाणूमुळे दोन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
 
कोविड -19 चे एका दिवसात 60,471 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 2,95,70,881 झाली आहे. 75 दिवसानंतर, देशात संसर्गाची इतके कमी केस आले आहेत. आणि दैनंदिन संसर्गाचे प्रमाणही 3.45 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
 
मृतांची संख्या 3.77 लाख
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संक्रमणामुळे आणखी 2726 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 3,77,031 झाला आहे. उपचारांतील प्रकरणेही 9,13,378 वर आली आहेत, जी संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 3.09 टक्के आहे. गेल्या 24 तासांत, उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 59,780 ने खाली आली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता  95.64 टक्के आहे.
 
संसर्ग दर 3.45 टक्के
आकडेवारीनुसार, देशातील कोविड -19 चे एकूण 38,13,75,984 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी सोमवारी 17,51,358 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दैनंदिन संसर्ग दर 3.45 टक्के आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिलेला आहे. त्याच वेळी, साप्ताहिक संसर्गाचे प्रमाणही 4.39 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची 39,27,154 लस दिली गेली त्यानंतर एकूण लसींची संख्या 25,90,44,072 इतकी झाली.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख