Dharma Sangrah

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (22:42 IST)
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या आकड्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. शनिवारी कोरोना विषाणूमुळे राज्यात 960 लोक मृत्यमुखी झाले. राज्यात कोरोना विषाणूंमुळे एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूची 34848 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. शनिवारी कोरोना विषाणूपासून 59073 लोक बरे झाले.
 
मुंबईतील कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबईत शनिवारी कोरोना विषाणूचे 1147 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, नवीन प्रकरणांच्या तुलनेत, 2333 रुग्ण बरे देखील झाले आहेत आणि 62 लोक मरण पावले आहेत.
 
नव्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 36,674 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील 634315 लोक कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत.  शहरात आतापर्यंत या महामारीमुळे 14200 लोक मरण पावले आहेत. तर शुक्रवारी मुंबईत कोरोना विषाणूची 1657 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 2572 लोक बरे झाले.
 
 ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूची 1,697 नवीन घटनांसह, संक्रमणाची एकूण संख्या 497810 पर्यंत वाढली आहे. शुक्रवारी ही सर्व प्रकरणे नोंदविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. जिल्ह्यात या साथीच्या आजाराने  59 लोका मृत्युमुखी झाले . यासह मृतांची संख्या वाढून 8370 झाली आहे. 
 
ठाण्यात कोविड -19 मृत्यू दर 1.68 टक्के असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड 19 चे प्रमाण वाढून 101857 झाले आहे, तर मृतांची संख्या1835 झाली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

LIVE: आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले

पुढील लेख
Show comments