Marathi Biodata Maker

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ,२४ तासांत राज्यात ३ हजार १४२ इतक्या नव्या रूग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 7 जुलै 2022 (07:49 IST)
राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १४२ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ९७४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका आहे.
 
राज्यामध्ये ७८,२५,११४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९० टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण १९ हजार ९८१ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५६०० इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात ३ हजार ३८४ सक्रिय रुग्ण आहेत.
 
बी ए.५ व्हेरीयंटचे ६ आणि बी ए. ४ चे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या शिवाय बीए. २.७५ या व्हेरियंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर बिश्नोई टोळीकडून भाजप नेत्याला धमकी

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; जीर्ण भिंत कोसळून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला, त्यांचा २३ वर्षांचा प्रवास उलगडला

धुळे जिल्ह्यात लग्न समारंभात रक्तरंजित हाणामारी, तीन जणांचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचांचा मृत्यू तर अनेक खेळाडू जखमी

पुढील लेख
Show comments