rashifal-2026

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली

Webdunia
शुक्रवार, 17 जुलै 2020 (08:58 IST)
देशात कोरोना थैमान घालत असताना दररोज देशात हजारो नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. गुरुवारी देशातील एकूण रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा आकडा वाढता असला तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढते आहे.
 
covid19india.org ने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात १० लाख २ हजार ७०७ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत २५ हजार ५९५ रूग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या कोरोनाबाधित एकूण रूग्णांपैकी ६ लाख ३५ हजार २४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ लाख ४१ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण भारतात आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून ६०६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
 
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा रेट ६३.२४ टक्के इतका आहेत. तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच देशातील मृत्यूदर हा ३.९१ टक्के इतका आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; फोन हिसकावून पाळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जीएसटी उपायुक्तांना अटक, सहाय्यक आयुक्त फरार

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ट्रकने चिरडून तीन कामगारांचा मृत्यू

प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पाला "विकसित महाराष्ट्र २०४७ साठी गुंतवणूक" असे संबोधले आहे

LIVE: प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पाला "विकसित महाराष्ट्र २०४७ साठी गुंतवणूक" असे संबोधले

पुढील लेख
Show comments