"सबका मालिक एक" हा त्यांचा संदेश प्रसिध्दच आहे. त्यामुळे शिख, हिंदू, मुसलमान, पारशी अशा सर्व समाजातीललोक त्यांचे भक्त आहेत.
श्री साईबाबा फकिरी वृत्तीचे अवलिया होते. मानवाच्या सुखाचे सार त्यागात, प्रेमात, आपलेपणात, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे असा त्यांचा उपदेश आहे. श्री साईबाबांना ज्या व्यक्ती अनन्यभावे शरण गेल्या त्यांचे ऐहिक जीवन सुखकर झाले, मनःशांती लाभली, त्यांचेमरण सुध्दा सूर्यास्तासारखे सहज विनासायास लाभले.