Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगली बातमी ! 15 महिन्यानंतर राज्यात तिसरा जिल्हा कोरोनासंसर्गापासून मुक्त झाला

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (12:00 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित झाला.आता, हळूहळू परिस्थिती सामान्यतेकडे वळत आहे.आतापर्यंत तीन जिल्हे कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. भंडारा जिल्हा शुक्रवारी कोरोना मुक्त घोषित करण्यात आला.जिल्ह्यातील उपचारांखालील एकमेव रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी येथे एकही नवीन प्रकरण नोंदवले गेले नाही. 
 
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्न तसेच ट्रेसिंग चाचणी आणि उपचार यामुळे भंडारा 15 महिन्यांनंतर कोरोनाव्हायरसपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे.
 
उपचारांखालील एकमेव कोरोना पेशंटला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 578 लोकांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली.त्यापैकी कोणीही कोरोना संक्रमित आढळले नाही. 
 
“जिल्ह्यात आता कोरोना विषाणूचे एकही रुग्ण नाहीत,” असे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे.इथले जिल्हाधिकारी म्हणाले की, पूर्व महाराष्ट्रातील भंडाराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या आणि लोकांच्या सहकार्याच्या सामूहिक प्रयत्नांनी महत्वाची भूमिका बजावली. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आगामी काळात कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. "
 
तज्ज्ञ म्हणाले की,कोरोना विषाणू एक संसर्गजन्य रोग आहे आणि त्याचा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे.
 
ते म्हणाले की, साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक पावले उचलली आहेत.अधिकृत आकडेवारीनुसार,आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचे 59,809 रुग्ण आढळले आहेत. तसेच 1,133 मृत्यू मुखी झाले आहेत.
 

संबंधित माहिती

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

पुढील लेख
Show comments