Publish Date: Sat, 11 Apr 2020 (13:23 IST)
Updated Date: Sat, 11 Apr 2020 (13:27 IST)
सध्याच्या घडीला कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन सुरु आहे. पण जर लॉकडाउन वाढवले गेले तर पाकिस्तानचे बारा वाजू शकतात. कारण बर्याच वर्षांनंतर पाकिस्तानकडे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आले आहे. जर ही स्पर्धा रद्द करावी लागली तर पाकिस्तानला मोठे नुकसान होऊ शकते.
आशिया चषक ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्याचे ठरवण्यात आहे होते. पण या गोष्टीला बीसीसीआयने नकार दिला. पाकिस्तानमध्ये खेळण्यास आम्ही तयार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआने घेतली होती.