Publish Date: Fri, 03 Apr 2020 (12:46 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2020 (13:00 IST)
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन गरजेचे होते, मात्र त्याची अंमलबजावणीची पद्धत चुकीची आहे. यामुळे देशातील लाखो स्थलांतरित मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
सोनिया यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली.