Dharma Sangrah

लॉकडाऊन हे पॉज बटण, समाधान नाही : राहुल गांधी

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:48 IST)
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या संकटावर कशी मात केली पाहीजे, याबाबत आपली मते मांडली. ते म्हणाले की, “मी टिका करायची म्हणून माझे मत मांडत नाही आहे, तर यातून काही तरी चांगले घडावे, अशी माझी इच्छा आहे. मी गेल्या काही दिवसांपासून अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी चर्चा करत आहेत. त्यातून मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्याबाबत मी सरकारला अवगत करु इच्छितो.”
 
कोरोना रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र लॉकडाऊन हे पॉज बटण आहे. ते समाधान नाही. व्हायरस पसरण्यापासून आपण फक्त थोड्या कालावधीसाठी पॉज करत आहोत. जेव्हा लॉकडाऊन उठवले जाईल. तेव्हा विषाणू पुन्हा पसरायला सुरुवात करेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला हवे. तर आपल्याला आरोग्य सुविधा चांगल्या करायला हव्यात, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
 
राहुल गांधी म्हणाले की, “कोरोना व्हायरसला हरविणारे सर्वात मोठे शस्त्र काय आहे? तर कोरोना टेस्टिंग करणे. आपण जास्तीत जास्त टेस्ट केल्या तर व्हायरस कुठून कुठे पसरत चाललाय हे कळू शकते. गेल्या काही दिवसांतील टेस्टची आकडेवारी पाहिले तर भारतातील सर्व जिल्ह्यांची सरासरी नुसार फक्त ३०० टेस्ट प्रति जिल्हा झालेल्या आहेत. जो पुरेसा नाही. सध्या आपण व्हायरस जिथे आढळतोय, तिथेच चाचण्या घेत आहोत. माझी मागणी आहे की, टेस्ट वाढवल्या पाहीजेत. रणनीती आखून टेस्ट वाढवल्या पाहीजेत.”
 
आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता काही दिवसांनी येणार आहे. अर्थव्यवस्था कोसळणार आहे. छोट्या उद्योगांना उतरती कळा लागणार आहे. हे प्रश्न इतर कोरोनाग्रस्त राष्ट्रात नाहीत. त्यामुळे भारताला कोरोना संकटाचा सामना करताना या प्रश्नांचा देखील सामना करावा लागणार आहे. आज आपण कोरोनावर विजय मिळवला असे बोलू शकत नाही. आता कुठे ही लढाई सुरु झाली असून ही लढाई लांबपर्यंत चालणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होईल

जुन्नर मध्ये दुचाकीची धडक होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

15 फेब्रुवारीनंतर नवीन खरेदीवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णय

पुढील लेख
Show comments