Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Corona Update: दिवसभरात ४ हजार नवे कोरोनाबाधित

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (23:03 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. आज शुक्रवारी राज्यात ४ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात १०५ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राज्यातील मृत्यू दर २.११ टक्क्यांवर आला आहे. राज्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपूर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी  कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
 
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता आज राज्यात ६ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. राज्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता राज्यात आतापर्यंत ६२ लाख २१ हजार ३०५ बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे मागील काही महिन्यांपासून वाढत आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा ९६.९७ इतका झाला आहे.
 
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ चाचण्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या ३ लाख २२ हजार २२१ रुग्ण होम क्वारंटाईन असून २ हजार ७४५ रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments