Festival Posters

जनधन खात्यातील रक्कम परत जाणार नाही : सोनवणे

Webdunia
शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (15:07 IST)
पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन केंद्र सरकारने अनुदानरूपी जनधन खात्यात जमा केलेले 500 रुपये कोणत्याही परिस्थितीमध्ये परत जाणार नाही याची महिला ग्राहकांनी नोंद घ्यावी  आणि रक्कम काढण्यासाठी विनाकारण बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी केले आहे.

ग्राहकांनी अतिमहत्वाच्या कामासाठी पैशांची निकड असेल तरच शाखेमध्ये येण्याची तसदी घ्यावी. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड उपलब्ध आहे, अशा ग्राहकांनी एटीएम केंद्रावरून पैसे काढावेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार इतर बँकांच्या एटीएम केंद्रावरून पैसे काढण्याची मर्यादा ही सदर संचारबंदीच्या काळासाठी शिथिल करण्यात   आली आहे, म्हणून ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

केंद्र सरकारने नुकतेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये समाजातील गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून जनधन योजनेत खाते असणार्‍या  महिलांच्या खात्यांमध्ये 500 रुपये प्रतिमहिना अनुदानरूपी जमा करण्याचे जाहीर केले आहे. सदर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला ग्राहकांची झुंबड सर्व बँकांच्या शाखांसमोर दिसून येत आहे.

बँकांसमोर ग्राहकांना अनुदान देण्यासोबतच, शासकीय, निशासकीय, खासगी कर्मचार्‍यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचे सुध्दा आव्हान आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी शिक्षक चॅटजीपीटीचा वापर करत होते, 3 शिक्षकांसह 4 जण निलंबित

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती ढासळली

चिखला गावात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना

गुरुग्राममध्ये लिव्ह-इन पार्टनरवर अत्याचार, ओलीस ठेवून मारहाण, गुप्तांग सॅनिटायझरने जाळले

आयएसआय आणि लष्करचा मोठा कट उधळला, 8 संशयित दहशतवादी अटक, 'फ्री काश्मीर'चे पोस्टर लावले होते

पुढील लेख
Show comments