suvichar

31 मार्च नव्हे, बंदचा निर्णय पुढील आदेशापर्यंत: अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2020 (18:46 IST)
करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय 31 मार्च नव्हे तर पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
पत्रकार परिषेदेत ते म्हणाले की लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पार पाडा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. 
 
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
 
कंपन्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागणार असून माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

9 कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित चीनी वॉकी-टॉकी जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, दोघांना अटक

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

अमेरिकेतून एलपीजी घेऊन जाणारे जहाज मंगळुरूला दाखल, सरकारने बंदर शुल्क माफ केले

Iran Israel War: इराणने दिमोना आणि अरादवर क्षेपणास्त्र हल्ला केला, १०० हून अधिक जखमी, अणुऊर्जा केंद्राजवळ विध्वंस

पुढील लेख
Show comments