rashifal-2026

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, कोरोनाच्या रुग्ण संख्येत इतकी टक्के घट, केंद्र सरकारची माहिती

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:33 IST)
महाराष्ट राज्यासाठी थोडी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एका बाजूला देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधित फटका हा महाराष्ट्राला बसला आहे असे आकडे समोर येत आहेत. मात्र आता केंद्रीय आरोग्य विभागानं सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. या आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. त्यांनी हि माहिती आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत  दिली आहे. 
 
सोबतच त्यांनी माहिती देतानां सांगितले की, देशात सध्या करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक चाचण्या केल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ११ लाख ७२ हजार चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही वाढून २९ लाख ७० हजारांवर पोहोचली असल्याचे राजेश भूषण म्हणाले. 
 
सध्या पाच राज्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या अधिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. सोबतच तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या ६२ टक्के केसेस आहेत. तसंच आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात या राज्यांमध्येच एकूण मृत्यूंच्या ७० टक्के मृत्यू झाल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र आरोग्य विभागाने 'नाईट स्क्वॉड' सुरू केले

सोलापूर: स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून बस स्टँड डेपो मॅनेजर निलंबित

बिहारमध्ये मायावतींच्या पक्षाला मोठा धक्का, बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली

नितीन गडकरी म्हणाले-दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेचा प्रवास फक्त १२ तासांचा असेल

पुढील लेख
Show comments