Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोल्ट्री उद्योगाला सध्याच्या टाळेबंदीमुळे अजून मोठा फटका बसला

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2020 (08:18 IST)
चिकन खाल्ल्यामुळे करोना होतो अशा खोडसाळ अफवांमुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला सध्याच्या टाळेबंदीमुळे अजून मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या अफवेमुळे ग्राहकांची चिकनसाठी असलेली मागणी उतरली आणि नंतर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सुद्धा व्यावसायिकांना चिकन उत्पादन कमी करावे लागले. सध्या या अफवा शांत झाल्या आहेत. तसंच चिकनची मागणीही वाढू लागली आहे. तरीही मागणी आणि पुरवठा यांचा मेळ नसल्याने चिकनचे दर बऱ्यापैकी वाढले आहेत.
 
एकीकडे चिकन महाग झाले आहे तर दुसरीकडे पोल्ट्री उद्योगाला या सगळ्या कारणांमुळे घरघर लागली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 5.06 कोटी कोंबड्या या संघटित क्षेत्रांमध्ये असल्या तरीसुद्धा नुकत्याच झालेल्या पशू जनगणनेमध्ये शेतकऱ्यांनी परसात वाढवलेल्या कोंबड्यांची संख्या हे लक्षणीय म्हणजेच 2.21 कोटी होती. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला बसलेल्या या फटक्यामुळे कुक्कुटपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहणाऱ्या शेतकऱ्यावर सुद्धा संक्रांत येत आहे, अशी कबुली राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यातले अधिकारी देतात.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments