Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढच्या महिन्यापासून कोवॅक्‍सिनचे पुण्यात उत्पादन

Webdunia
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:08 IST)
भारत बायोटेक कंपनीची करोना प्रतिबंधक लस कोवॅक्‍सिनचे उत्पादन पुण्यातील मांजरी येथील कंपनीत सुरू होणार आहे. लस उत्पादनाची प्रायोगिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरपासून लसींचे उत्पादन सुरू होऊन त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
 
देशावरील करोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता.
त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने करोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन हवेली तालुक्‍यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकल्पासाठी या जागेचा ताबादेखील दिला. आता भारत बायोटेककडून लसीचे उत्पादन करण्यासाठी आवश्‍यक ती तयारी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
लस उत्पादनाची कंपनीकडून तयारी पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात कंपनीला भेट देऊन पाहणी करणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. या कंपनीतून साडेसात कोटी लसींचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वीजपुरवठा, पर्यावरणविषयक परवानगी, जागेचे हस्तांतरण, करारनामे आदी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंपनीकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची तयारी पूर्ण झाली आहे. कंपनीसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश यापूर्वीच पुणे महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार दररोज सात ते आठ टॅंकर पाणी पुरवठा होत आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments