Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३ मे पर्यंत रेल्वे आहे पूर्ण बंद मात्र ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही

३ मे पर्यंत रेल्वे आहे पूर्ण बंद मात्र ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही
Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:46 IST)
देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद राहणार असून फक्त मालवाहतूक सुरु आहे. आयआरसीटीसीने मंगळवारी स्पष्ट केले की, 3 मे पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांचे ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही. एएनआयच्या ट्विटनुसार आयआरसीटीसीने प्रवाशांना सांगितले आहे की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाही. प्रवाशांना त्यांच्या तिकीटेचा परततावा मिळेल. ई-तिकीट आपोआप रद्द होईल आणि प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
 
देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 3 मे पर्यंत देशभर लॉकडाऊन सुरु ठेवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसचा संसर्गाचा पसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे आहे. देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर तिकिट रद्द करणे आणि परताव्यसंदर्भात आयआरसीटीसीकडून माहिती देण्यात आली आहे.
 
तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने सांगितले की, प्रिमियम गाड्या, मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वेसह सर्व प्रवासी गाड्यांची सेवा 3 मे 2020 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय उड्डेणेदेखील 3 मे रोजी रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. नागरी उड्डायन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments