Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३ मे पर्यंत रेल्वे आहे पूर्ण बंद मात्र ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:46 IST)
देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद राहणार असून फक्त मालवाहतूक सुरु आहे. आयआरसीटीसीने मंगळवारी स्पष्ट केले की, 3 मे पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांचे ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही. एएनआयच्या ट्विटनुसार आयआरसीटीसीने प्रवाशांना सांगितले आहे की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाही. प्रवाशांना त्यांच्या तिकीटेचा परततावा मिळेल. ई-तिकीट आपोआप रद्द होईल आणि प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
 
देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 3 मे पर्यंत देशभर लॉकडाऊन सुरु ठेवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसचा संसर्गाचा पसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे आहे. देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर तिकिट रद्द करणे आणि परताव्यसंदर्भात आयआरसीटीसीकडून माहिती देण्यात आली आहे.
 
तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने सांगितले की, प्रिमियम गाड्या, मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वेसह सर्व प्रवासी गाड्यांची सेवा 3 मे 2020 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय उड्डेणेदेखील 3 मे रोजी रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. नागरी उड्डायन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments