Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक बातमी !राज्यात 57 लाख रुग्ण कोरोना मुक्त झाले,10373 रुग्ण बरे झाले

Webdunia
रविवार, 20 जून 2021 (12:12 IST)
शनिवारी राज्यात कोविड -19  चे 8,912 नवीन रुग्ण आढळले आणि संक्रमणामुळे 257 ​​लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्यांची संख्या कमी होऊन 59,63,420 आणि मृतांचा आकडा 1,17,356  इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
 
विभागाने म्हटले आहे की यापूर्वी 8 मार्च रोजी राज्यात 8,744 प्रकरणे नोंदली गेली. दिवसभरात 10,373  रूग्णांना सोडण्यात आले असून,राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 57,10,356, इतकी झाली असून, राज्यात सध्या रूग्णांची संख्या 1,32,597 पर्यंत खाली आली आहे.
 
महाराष्ट्रातील रूग्णांचे रिकव्हरी दर आता 95.76टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.97टक्के आहे. विभागानुसार 2,34,379 नवीन चाचण्या करून राज्यात  आतापर्यंत चाचणी घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 3,93,12,920 वर पोहोचली आहे. 
 
राज्यात एकूण 8,06,506लोक सध्या गृह विलगीकरणात आहे, तर आणखी  4,695 रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मुंबई शहरात संसर्गाचे 676 नवीन प्रकरणे आले आहे आणि 13 मृत्यूच्या नवीन घटना घडल्या  असून महानगरात संक्रमणाची एकूण संख्या 7,19,266 आणि मृतांचा आकडा 15,279 झाला आहे.
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments