Marathi Biodata Maker

दिलासादायक, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:31 IST)
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत होते. पण रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं दिलासादायक चित्र  समोर आलं आहे. सोमवारी राज्यात 5,984 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 13,84,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 % एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात सोमवारी 125 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81,85,778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,01,365 (19.56 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,14,577 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 23,285 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1,73,759 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 5,984 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16,01,365 झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments