Festival Posters

कोरोनाची लक्षण नसलेल्या कोरोनाग्रस्तांना लवकर घरी सोडण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू

Webdunia
शुक्रवार, 8 मे 2020 (09:08 IST)
कोरोनाची कुठलीही लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडाभरात घरी पाठविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. घरी पाठविण्यापूर्वी २ ऐवजी एकच चाचणी या रुग्णांची करण्याचाही प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांची प्रतिक्षा करत आहोत.
 
यामुळे कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या राज्यात ५४ ठिकाणी दिवसाला ८ ते १० हजार चाचण्या होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
राज्यात सध्या ९४३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या ५० लाख घरांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं आहेत का, याची तपासणी केली आहे.
 
कोरोनाची लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाग्रस्त असलेल्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी रेल्वे, लष्कर आणि केंद्र सरकारच्या इतर आस्थापनांची रुग्णालयं उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केली होती. त्यानुसार रेल्वेच्या रुग्णालयांची सेवा राज्यासाठी उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
राज्यातल्या सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सुरू केला आहे. सुमारे १ हजार हॉस्पिटलमध्ये याअंतर्गत विविध सुविधा उपलब्ध आहेत. प्रसृती, सिझेरिन वगैरे शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरिक या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात एकही पैसा न देता उपचार घेऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
 
राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले. सरकारी रुग्णालयात या डॉक्टरांना तात्पुरती सेवा द्यायची असेल तर सरकार त्यांच्या शिक्षणानुसार १ लाख ते ४ लाखापर्यंत दरमहा मानधन द्यायला तयार आहे. ५५ वर्षापेक्षा कमी वयाचे आणि इतर आजार नसलेल्या डॉक्टरांनी जनसेवेसाठी तयार व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments