Festival Posters

नाशिक जिल्ह्यात इतक्या जणांचे झाले लसीकरण !

Webdunia
शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:28 IST)
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाईट अनुभव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेगाने लसीकरणास सुरुवात केली आहे. पण जिल्ह्याची स्थिती पाहता अद्यापही तब्बल ५६ लाख ६७ हजार ४५५ जणांचे लसीकरण होणे बाकीच आहे. आतापर्यंत १६ लाख २१ हजार ५३५ जणांनी लस घेतली असून १२ लाख ६१ हजार ३२८ जणांनी पहिला तर ३ लाख ६० हजार २०७ जणांनी दुसरा प्रतिबंधक डोस घेतला आहे.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सामान्यांमध्ये भीती होती. त्यानंतर काळातच जगभर विविध प्रकारच्या लसींची निर्मितीही झाली. प्रथम नागरिकांनी लस घेण्याबाबत अनुत्सुकता दाखविली. मात्र दुसरी लाट आली अन् अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यातून लस उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांचा कल वाढला. अन् आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी नागरिकांची तर झुंबडच उडाली आहे.
 
केंद्राकडून डोस कमी प्रमाणत उलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्राबाहेर तर लसीकरणाच्या दिवशी रांगाच लागत आहेत. याच स्थितीत जिल्ह्यास गुरुवारी ४३ हजार लसचे डोस प्राप्त झाले. त्याचे शहर, ग्रामीण असे लोसंख्येच्या प्रमाणात वितरणही झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागात ४८ लाख १६ हजार २३७ इतके लसीकरणास पात्र नागरिक राहातात. नाशिक मनपा हद्दीत १९ लाख १० हजार २३१ इतके तर मालेगाव मनपामध्ये ५ लाख ६२ हजार ५२२ इतके पात्र नागरिक राहातात.
 
अशा एकूण ७२ लाख ८८ हजार ९९० जणांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता १ कोटी २४ लाख ३२ हजार ५३९ डोसेसची आवश्यकता आहे. परंतु सध्या जिल्ह्यात आठवड्याला ४० हजार डोसही महत्प्रयासाने उपलब्ध होत असल्याने केव्हा ही सव्वा कोटी डोस प्राप्त होतील अन् जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लसीकरण होईल, याच चिंतेत प्रशासन आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईसह राज्यभरातील ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले

नेत्यांचे दौरे रद्द: मंत्री उदय सामंत म्हणाले-शिंदे सेनेच्या नेत्यांनी आपले नियोजित परदेश दौरे रद्द केले असून आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही कमी केली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या ३ शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

पुण्यातील हडपसर येथे बॉम्बसारखी एक संशयास्पद वस्तू आढळल्याने रुग्णालयाजवळ घबराट पसरली

गुरुदेवांच्या ७० व्या जन्मोत्सवनिमित्त जागतिक शांततेचा संदेश; १८२ देशांतील लाखो लोकांनी सामूहिक ध्यानात सहभाग घेतला

पुढील लेख
Show comments