Dharma Sangrah

नाशिक जिल्ह्यात इतक्या जणांचे झाले लसीकरण !

Webdunia
शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:28 IST)
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाईट अनुभव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेगाने लसीकरणास सुरुवात केली आहे. पण जिल्ह्याची स्थिती पाहता अद्यापही तब्बल ५६ लाख ६७ हजार ४५५ जणांचे लसीकरण होणे बाकीच आहे. आतापर्यंत १६ लाख २१ हजार ५३५ जणांनी लस घेतली असून १२ लाख ६१ हजार ३२८ जणांनी पहिला तर ३ लाख ६० हजार २०७ जणांनी दुसरा प्रतिबंधक डोस घेतला आहे.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सामान्यांमध्ये भीती होती. त्यानंतर काळातच जगभर विविध प्रकारच्या लसींची निर्मितीही झाली. प्रथम नागरिकांनी लस घेण्याबाबत अनुत्सुकता दाखविली. मात्र दुसरी लाट आली अन् अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यातून लस उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांचा कल वाढला. अन् आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी नागरिकांची तर झुंबडच उडाली आहे.
 
केंद्राकडून डोस कमी प्रमाणत उलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्राबाहेर तर लसीकरणाच्या दिवशी रांगाच लागत आहेत. याच स्थितीत जिल्ह्यास गुरुवारी ४३ हजार लसचे डोस प्राप्त झाले. त्याचे शहर, ग्रामीण असे लोसंख्येच्या प्रमाणात वितरणही झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागात ४८ लाख १६ हजार २३७ इतके लसीकरणास पात्र नागरिक राहातात. नाशिक मनपा हद्दीत १९ लाख १० हजार २३१ इतके तर मालेगाव मनपामध्ये ५ लाख ६२ हजार ५२२ इतके पात्र नागरिक राहातात.
 
अशा एकूण ७२ लाख ८८ हजार ९९० जणांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता १ कोटी २४ लाख ३२ हजार ५३९ डोसेसची आवश्यकता आहे. परंतु सध्या जिल्ह्यात आठवड्याला ४० हजार डोसही महत्प्रयासाने उपलब्ध होत असल्याने केव्हा ही सव्वा कोटी डोस प्राप्त होतील अन् जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लसीकरण होईल, याच चिंतेत प्रशासन आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

महाराष्ट्रात 20 ठिकाणी एटीएसचे छापे

गडचिरोलीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

मुंबईत कारच्या धडकेत एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू, अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

डोंबिवली पूर्वेतील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली, 29 दुचाकी जळून खाक

पुढील लेख
Show comments