Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल : आरोग्यमंत्री

Social distance
Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (08:50 IST)
राज्यात चौथ्या लॉकडाऊनची सुरूवात झाली असून त्यामध्ये नवे नियम देखील जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा पद्धतीने राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. मात्र, नव्या नियमांनुसार ज्या ठिकाणी ज्या बाबींची सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं फार गरजेचं आहे, अशी भूमिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे. ‘कोविडसोबत राहायचंय, तर सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. मास्कचा नियमित वापर, स्वच्छता, हात वारंवार धुणं, थर्मल स्कॅनिंग ठेवणं गरजेचं आहे, सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे. लग्नकार्य किंवा अंत्यसंस्कार अशा ठिकाणी ५० हून जास्त लोक असू नयेत’, असं ते म्हणाले आहेत. सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संपर्क साधला.  
 
डबलिंग रेट १० वरून १४ पर्यंत गेला आहे. आपण रोज १५ हजारांहून जास्त टेस्ट करत आहोत. देशभरात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात ६७ ठिकाणी आता चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर १० लाख लोकांमागे चाचण्या करण्याची क्षमता महाराष्ट्रात सर्वाधिक आहे’, असं देखील त्यांनी नमूद केलं. ‘मुंबई वगळता राज्यात कुठेही बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती नाही. बेड, डॉक्टर, पीपीई किट यांची कमतरता नाही. मुंबईत काही प्रमाणात ही परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, ती कायमस्वरूपी राहणार नाही, याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कोविड रुग्णालयं उभारण्याची तयारी करण्यात आली आहे , अशी माहिती त्यांनी दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भिवंडीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा', राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आवाहन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी समावेशक, प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यावर दिला भर

१७ वर्षांपासून भारतात राहत होता, पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिकाचे निधन

पुढील लेख
Show comments