Festival Posters

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (23:17 IST)
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून, केंद्र सरकारही सावध झालं आहे.  महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. ही पथकं राज्य सरकारांसोबत करोना परिस्थितीवर नजर ठेवण्याबरोबरच संक्रमण नियंत्रण आणि साखळी तोडण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना मदत करणार आहे.
 
राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे शहर ८४९, पिंपरी-चिंचवड ५४९, उर्वरित पुणे जिल्हा ३६९, नाशिक शहर ३५२, जळगाव जिल्हा ५४०, सातारा २१४, औरंगाबाद ३१८, अकोला १४८, अमरावती शहर ४३५, यवतमाळ २५१, वाशिम २०७ नवे रुग्ण आढळले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

Monsoon 2026: १६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश; या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी

हिंगणघाटमध्ये भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

आनंदवार्ता! मान्सून लवकरच धडकणार

पुढील लेख
Show comments